ऑपरेशन सिंदूर सुरुच! भारतीय सैन्य दलाचं मोठं पाऊल, 20 ठिकाणी छापे, धक्कादायक माहिती समोर 

Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्धची मोहीम तीव्र केलीआहे. दरम्यान, राज्य तपास यंत्रणेला एक मोठे यश मिळाले आहे.

Continues below advertisement

Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्धची मोहीम तीव्र केलीआहे. दरम्यान, राज्य तपास यंत्रणेला एक मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे टाकून स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांची चौकशी सुरू आहे.

Continues below advertisement

पाकिस्तानच्या कुरापतीनंतर भारतीय सैन्य दल सतर्क

राज्य तपास संस्थेने (SIA) एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीर पोलिस काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी सहकाऱ्यांवर आणि ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW) वर लक्ष ठेवून आहेत. तांत्रिक गुप्तचर यंत्रणेने उघड केले आहे की काश्मीरमधील अनेक स्लीपर सेल पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या मालकांशी थेट संपर्कात होते आणि व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल इत्यादी मेसेजिंग अॅप्सद्वारे सुरक्षा दल आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांबद्दल संवेदनशील आणि धोरणात्मक माहिती पुरवण्यात गुंतलेले होते. हे दहशतवादी सहकारी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कमांडर्सच्या आदेशानुसार ऑनलाइन कट्टरपंथी प्रचारात देखील सहभागी होते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेला धोका निर्माण झाला होता. दरम्यान, सध्या पाकिस्तानच्या कुरापतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दल सतर्क झालं आहे. 

20 ठिकाणी छापे, आक्षेपार्ह साहित्य जप्त

दक्षिण काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले. छाप्यादरम्यान, मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की या संस्था दहशतवादी कटात सक्रियपणे सहभागी आहेत आणि भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला आव्हान देण्यासाठीच नव्हे तर असंतोष, सार्वजनिक अव्यवस्था आणि सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्यासाठी देखील भारतविरोधी कारवाया करत आहेत.

भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला 

22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याने संपूर्ण देश हादरुन गेला होता. सर्वजण दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत होते. यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली आणि ऑपरेशन सिंदीर अंतर्गत, पाकिस्तान आणि पीओकेवर हल्ला केला आणि 9 दहशतवादी अड्डे नष्ट केले होते. 

महत्वाच्या बातम्या:

Operation Sindhoor : अणवस्त्र वापराची भीती अन् भारत-पाकिस्तानचे फोन खणाणले, भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीची Inside Story

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »