ट्रेंडिंग
India Pak War : भारताविरुद्ध लढा राहिला पाकिस्तानातच गृहकलह सुरु, शाहबाज शरिफ यांच्या विरोधात आंदोलनाचा भडका
India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं काल रात्री भारतामधील 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतानं त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची HQ9 ही प्रणाली उद्धवस्त करुन टाकली होती. भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम प्रणालीपुढं पाकिस्तानचा निभाव लागला नव्हता. तरी देखील भारतावर हल्ला करण्याचं भ्याड धाडस पाकिस्ताननं केलं. पाकिस्तानला हा प्रयत्न देखील महागात पडला आहे. भारताच्या पश्चिम सीमेवरील राज्यांमध्ये पाकिस्ताननं ड्रोन, मिसाईल आणि विमानांद्वारे हल्ला करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला. मात्र, भारताच्या एस-400 एअर डिफेन्स प्रणालीनं पाकिस्तानच्या मिसाईल, ड्रोन आणि विमानांना पाडलं आहे. भारताविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ आणि सेनाप्रमुख असीम मुनीर अडचणीत आले आहेत.
पाकिस्तानच्या सेनादलाचा प्रमुख असीम मुनीर याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्या आंदोलन सुरु झालं आहे. बलुचिस्तान येथील बलुच लिबरेशन आर्मीनं शाहबाज शरीफ यांच्या विरोधात आंदालन करत त्यांना हटवण्याची मागिणी केलीय. तर, बलुचिस्तान फ्रीडम फायटर्सकडून पाकिस्तानवरच हल्ला करण्यात आला आहे. यामुळं पाकिस्तान दुहेरी अडचणीत सापडला आहे.
पाकिस्तानच्या सेना प्रमुखाची उचलबांगडीची शक्यता
पाकिस्तानचा सेना प्रमुख असीम मुनीर याची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये त्याला ताब्यात घेऊन देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी आर्मीकडून जनरल शहीर शमशाद मिर्झा याच्याकडे सेना प्रमुखपद सोपवलं जाऊ शकतं. असीम मुनीर यानं वैयक्तिक अजेंड्यापोटी पाकिस्तानाला विनाशाच्या मार्गावर नेलं. मुनीरला ताब्यात घेत त्याला अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. असीम मुनीर याच्यावर लष्करी कोर्टाकडून कारवाई केली जाऊ शकते. इमरान खानला देखील लवकरच तुरुंगातून बाहेर काढलं जाऊ शकतं. इमरान खानच्या समर्थकांनी त्याला सोडण्याची मागणी सुरु केली आहे. त्याचवेळी अमेरिकेनं देखील पाकिस्तानला परिस्थिती आणखी बिघडवू नका, असा इशारा दिला आहे.
भारताने पाकिस्तानच्या 16 शहरांवर हल्ला
भारताने पाकिस्तानच्या इस्लामाबादसह लाहोर, सियालकोट सारख्या 16 शहरांवर हल्ला केला आहे. एकीकडे वायू दलाचा आणि लष्कराचा हल्ला तर दुसरीकडे नौदलानेही हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतानं केलेल्या पलटवारामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. भारतानं कराची पासून लाहोरपर्यंत हल्ले केले आहेत. तर, इस्लाबादपासून एबोटाबादपर्यंत हल्ले केले आहेत.