एक्स्प्लोर

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे

वक्फ बोर्ड रद्द केल्यानंतर आंध्र प्रदेश सरकार आता एक नवीन बोर्ड स्थापन करणार आहे.

मुंबई : केंद्रात भाजप एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातही केंद्रातील विचारसरणीचं सरकार स्थापन होत आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारला तब्बल 237 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं असून 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा संपन्न होत आहे. त्यातच, केंद्रातील एनडीएचा घटक असलेल्या आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) नायडू सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गत जगनमोहन रेड्डी सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील जनतेनं चंद्राबाबू नायडू यांच्याबाजुने कौल दिला. त्यानंतर, नायडू सरकारने मोठा निर्णय घेत, राज्यातील वक्फ बोर्ड रद्द केलं आहे. राज्याचे कायदा व अल्पसंख्यांक मंत्री एन. मोहम्मद फारुक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, वक्फ बोर्ड (Waqf borad) रद्द करण्यात आल्याचा निर्णय शनिवारीच जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, नायडू सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

वक्फ बोर्ड रद्द केल्यानंतर आंध्र प्रदेश सरकार आता एक नवीन बोर्ड स्थापन करणार आहे. नायडू सरकारने गत जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात जारी करण्यात आलेल्या जीओ-47 ला रद्द करुन, जीओ-75 जारी केलं आहे. हा नियम वापस घेण्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी, काही कारणे समोर आली आहेत. 

वक्फ बोर्ड रद्द करण्याची कारणे

जी.ओ. सुश्री संख्या 47 च्या विरोधात 13 रीट याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 
सुन्नी आणि शिया समुदायांच्या स्कॉलर्सचे कुठलेही प्रतिनिधित्व यामध्ये नाही. 
बोर्डमध्ये माजी खासदारांचा सहभाग करण्यात आलेला नाही
बार कॉन्सिल श्रेणीमधून ज्युनिअर अधिवक्त्यांना योग्य मानदंडाशिवाय निवडण्यात आले होते. त्यामुळे, याचिका दाखल करणाऱ्या वरिष्ठ अधिवक्तांच्या हितांची टक्कर झाली. 
एस.के. ख्वाजा यांची बोर्ड सदस्य म्हणून करण्यात आलेल्या निवडीविरुद्ध अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुतवल्लीच्या रुपाने त्यांची पात्रता यावरुन अनेक प्रश्न उभे राहिले होते. 
विविध न्यायालयीन खटल्यामुळे अध्यक्षाची निवडणूक झाली नाही
मार्च 2023 पासूनच वक्फ बोर्ड निष्क्रिय आहे, ज्यामुळे कामकाज पूर्णपणे थांबलं आहे. 

हेही वाचा

रक्तानं पत्र लिहल्याने कुणी मुख्यमंत्री होत नसतं, CM पदासाठी आमचं नाव ठरलंय; दानवेंनी स्पष्टच सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sudhakar Badgujar : भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले...
भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले...
Maharashtra Politics: शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
मुंबईत मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्पष्टच सांगितलं
मुंबईत मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis on Sudhakar Badgujar : बडगुजरांवर कोणतीच कारवाई नाही, जुना इतिहास बाजूला, त्यांनी भाजप नियमाने वागावं : देवेंद्र फडणवीस
बडगुजरांवर कोणतीच कारवाई नाही, जुना इतिहास बाजूला, त्यांनी भाजप नियमाने वागावं : देवेंद्र फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray on Hindi Compulsion : मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी पेटवला,  मनसे कमबॅक करण्यासाठी सज्ज?Raj Thackeray : शाळांमध्ये हिंदी कशी शिवकता हे बघतोच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज!Raj Thackeray Full PC : पोटतिडकीने 3 पत्र वाचली, हिंदी सक्तीला विरोध, मराठीसाठी रान पेटवणार?Dada Bhuse on Hindi : हिंदी अनिवार्य आहे की नाही? दादा भूसे नेमकं का म्हणाले? ABP MAJHA

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sudhakar Badgujar : भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले...
भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले...
Maharashtra Politics: शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
मुंबईत मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्पष्टच सांगितलं
मुंबईत मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्पष्टच सांगितलं
Devendra Fadnavis on Sudhakar Badgujar : बडगुजरांवर कोणतीच कारवाई नाही, जुना इतिहास बाजूला, त्यांनी भाजप नियमाने वागावं : देवेंद्र फडणवीस
बडगुजरांवर कोणतीच कारवाई नाही, जुना इतिहास बाजूला, त्यांनी भाजप नियमाने वागावं : देवेंद्र फडणवीस
Raj Thackeray: उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय; भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा
उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय; भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा
Devendra Fadnavis on Hindi Compulsion: राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला, नेमकं काय म्हणाले?
प्रवास सुलभ करण्यासाठी सरकारचं क्रांतिकारी पाऊल, फक्त 3000 रुपयात करता येणार वर्षभर प्रवास, 15 ऑगस्टपासून नवीन FASTag आधारित वार्षिक पास
प्रवास सुलभ करण्यासाठी सरकारचं क्रांतिकारी पाऊल, फक्त 3000 रुपयात करता येणार वर्षभर प्रवास, 15 ऑगस्टपासून नवीन FASTag आधारित वार्षिक पास
हिंदीला दिली ओसरी अन् हातपाय पसरी, हिंदीला देण्यात येणारं प्रोत्साहन वेळीच थांबवा, रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
हिंदीला दिली ओसरी अन् हातपाय पसरी, हिंदीला देण्यात येणारं प्रोत्साहन वेळीच थांबवा, रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
Embed widget
OSZAR »