Wardha Crime : शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना
Wardha Crime News : शेताच्या बांधावर भावाने सख्ख्या भावाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना देवळी तालुक्यातील दिघी बोपापूर रस्त्यावर असलेल्या शेतात घडली आहे.
Wardha Crime News : शेताच्या बांधावर भावाने सख्ख्या भावाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना देवळी तालुक्यातील दिघी बोपापूर रस्त्यावर असलेल्या शेतात घडली आहे. मृतक शंकर नानाजी येळणे या 65 वर्षीय भावाला भावनेच संपवले (Wardha Crime) आहे. शेतजमिनीच्या वादातून ही हत्या झाली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेय. दिघी-बोपापूर रस्त्यावर देवळी शिवारात शंकर नानाजी येळणे यांचे शेत आहे. सायंकाळी शेतात असताना त्यांचा भाऊ बाबाराव नानाजी येळणे हे देखील तेथेच होते. शेतात असलेल्या हनुमान मंदिराजवळ असताना यांच्यात वाद झाला. दुर्दैवाने हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करीत शंकर नानाजी येळणे यांना जखमी केले, यात त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतकाचे भाऊ बाबाराव येळणे यांना ताब्यात घेतले असून देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अंगावर झाड कोसळून जांब शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील जांब गावाजवळ काल(10 जून) सायंकाळी झालेल्या वादळ वाऱ्याच्या तडाख्यात एक शेतकरी मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. रामकृष्ण कुडमते (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असताना कुडमते हे शेतातून घरी परतत होते. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या एका मोठ्या सागाच्या झाडाजवळ थांबले. दरम्यान अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे झाड मुळासकट उन्मळून अंगावर पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
ट्रेंडिंग
उमरखेड 24 तासापासून अंधारात; महावितरणच्या कर्मचाऱ्याला केले कार्यालयात बंद
यवतमाळच्या उमरखेड शहरासह ग्रामीण भागात 24 तासापासून लाइन नसल्याने अंधारात असल्याने छोटे मोठे व्यवसायिक यांच्यासह नागरिकान त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी प्रहार पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्यासह रात्री 11 वाजताच्या सुमारात महावितरणच्या कार्यालयावर धडक देत आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी कर्मचाऱ्यांकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्याला कार्यालयाच्या रूम मध्ये बंद करत जोपर्यंत अधिकारी इथे येऊन आमच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही व शहरातील लाईन तात्काळ चालू करत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे आंदोलनकरते व नागरिकांचा संतप्त झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
इतर महत्वाच्या बातम्या