Nagpur Crime News : फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टी नागपूर पोलिसांनी उधळली; 4 महिलांसह चौघा 'झिंगाट' मित्रांना अटक

Nagpur Crime News : नागपूर शहरालगत असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकत ही रेव्ह पार्टी उधळून लावली आहे.  

Continues below advertisement

Nagpur Crime News : नागपूर शहरालगत असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकत ही रेव्ह पार्टी उधळून लावली आहे.  नागपूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमध्ये (Crime News) 4 महीला आणि 4 पुरुष सहभागी असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना (Nagpur Police) या ठिकाणी काही प्रमाणात एम.डी हे अमली पदार्थ ही या ठिकाणी आढळून आले आहे.  हे अमली पदार्थ पोलिसांनी त्या ठिकाणातून जप्त करत पुढील चौकशी सुरू केली आहे. यावेळी 2 चारचाकी वाहनांसह 6 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण 26 लाखांचा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा आधिक तपास करत आहे.  

Continues below advertisement

एकुण 26 लाखांचा मुद्देमालसह 4 महिला अन् चौघा 'झिंगाट' मित्रांना अटक

पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर-जबलपूर मार्गावरील "एस फॉर्म" या खाजगी फार्म हाऊसमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर ही एक पार्टी सुरू होती. त्या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलि‍सांना मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने सामाजिक सुरक्षा पथकासह त्या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळेस त्या ठिकाणी असलेल्या चार महिला आणि चार षुरुष अशा आठ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र यावेळी एम.डी हे अमली पदार्थ आढळून आल्याने ते नेमकं कुणी आणि कोणी पुरवलं याचा शोधही पोलीस आता घेत आहे. 

दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यामध्ये सुनील शंकरलाल अग्रवाल (वय 61, रा. रामलक्ष्मी कॉलनी, कामठी), गौतम सुशील जैन (वय 51, रा. रामदासपेठ), नीलेश बाबुलाल गडिया (वय 61, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ) आणि मितेश मोहनलाल खक्कर (वय 48, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

डिव्हायडरला दुचाकी धडकल्याने दोघांचा मृत्यू

यवतमाळ जवळील नागपूर-तुळजापूर मार्गावरील बलवंत मंगल कार्यालयासमोर दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.  प्रेम संतोष बावणे आणि रोहित आमटे असे मृतकाचे नाव आहे. दोघेजण वाघाडी करून यवतमाळकडे येत असताना हा भीषण अपघात झाला. उडान पूलचे काम सुरू आहे. अशातच काम सुरू असताना डिव्हायडर रस्त्याच्या मधोमध आहे. ये-जा करणाऱ्या कोणत्याही प्रवाश्यांना डिव्हायडर दिसत नाही त्यामुळेच हे अपघात होत असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »