पतंजलीची संशोधन अन् विकास प्रयोगशाळा : आयुर्वेदिक उत्पादनांची सुरक्षा आणि परिणाम कसा निश्चित होतो?
Patanjali Ayurved:लोक आता रासायनिक औषधांच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदाकडे वळत आहेत. जी नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धती मानली जाते.

Patanjali Ayurved: भारतात आता लोक मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर करत आहे. याचा अर्थ नैसर्गिक आणि प्राकृतिक उपचारांवर लोकांचा विश्वास वाढत आहे. याचं सर्वात मोठं कारण त्या औषधांची सुरक्षा आणि परिणामाची हमी हे आहे. पतंजलीनं सांगितलं की त्यांच्या संशोधन आणि विकासाच्या प्रयोगशाळा म्हणजेच R&D लॅब्सच्या माध्यमातून आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाचं एकत्रीकरण मांडतं.
कंपनीच्या दाव्यानुसार पतंजली रिसर्च फाऊंडेशन उत्पादनांच्या सुरक्षा आणि परिणामाला सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोणाचा वापर केला जातो. या प्रयोगशाळेत 300 हून अधिक वैज्ञानिक हर्बल आणि नैसर्गिक उत्पादनांवर सखोल संशोधन केलं जातं. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर पुरावा आधारित औषधाच्या रुपात प्रस्तुत केलं जावं.
उच्च गुणवत्तेच्या जडी-बुटीचा वापर : पतंजली
कंपनीनं सांगितलं की,''पतंजली च्या R&D प्रक्रियेची सुरुवात कच्चा माल निवडीपासून सुरु होते. जिथं उच्च गुणवत्तेच्या जडी बुटी आणि नैसर्गिक साधन सामग्रीची निवड केली जाते. याच्या शुद्धतेच्या आणि गुणवत्तेच्या संशोधनासाठी अत्याधुनिक मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेचा वापर होतो. उत्पादनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्राणी आणि मनुष्यांवर चाचण्या घेतल्या जातात. पतंजलीच्या या इन विवो लॅब्सला समिती फॉर कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ एक्सपेरिमेंट्स ऑन एनिमल्स (CCSEA) कडून मान्यता मिळाली आहे. जी नैतिक आणि वैज्ञानिक मानकांचं पालन करते.
कंपनीच्या दाव्यानासुार , ''लॅब्स मध्ये NABL, DSIR आणि DBT सारख्या प्रतिष्टित संस्थांच्या मान्यता प्राप्त उपकरणों चा उपयोग केला जातो. ही उपकरण आयुर्वेदिक फॉर्मूलेशन ला वैज्ञानिक रुपात विकसित आणि पारखण्यासाठी मदत करते. प्रत्येक उत्पादनाचं कठोर परीक्षण केलं जातं. ज्यामध्ये स्थिरता, विषावक्तता आणि परिणामकारता या मूल्यांकनाचा समावेश आहे. उदा. पतंजलीच्या च्यवनप्राश आणि हर्बल साबण या सारख्या उत्पदानांची गुणवत्ता आणि गुणकारकता याला व्यापकपणे नावाजलं गेलं आहे.कंपनीचा उद्देश भारत नाहीत तर जागतिक बाजारात आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवणं हा आहे.
आत्मनिर्भर भारत व्हिजन साकारतोय
कंपनीच्या मते ''पतंजलीच्या R&D प्रयोगशाळा केवळ उत्पादनांची गुणवत्ता निश्चित करत नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुनिश्चित करते. शेतकरी आणि जडी बुटी उत्पदाकांच्या भागीदारातून कंपनी आत्मनिर्भर भारत व्हिजन साकारात आहे. हा प्रवास आयुर्वेदाला आधुनिक आरोग्य सेवेत महत्त्वाचं स्थान मिळवून देण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

