एक्स्प्लोर

Budget 2025 : निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार,बँकांच्या तिजोरीत 45000 कोटी वाढणार, बजेटमधील घोषणा फायदेशीर

Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार आहे. अर्थसंकल्पातील त्या घोषणेनं बँकांच्या हाती 45000 कोटींचा खजिना येणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या प्राप्तिकरासंदर्भातील बदलांचा काय फायदा होणार हे सागितलं आहे. करदात्यांना करसवलत दिल्यानं आणि टीडीएसच्या नियमांमध्ये बदल केल्यानं बँकांच्या हाती  अतिरिक्त 45000 कोटी रुपये येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकांना ही रक्कम उपलब्द होईल असं ते म्हणाले. 

एम. नागराजू यांनी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या करसवलतीच्या निर्णयानं बँकांच्या ठेवीमध्ये  20 हजार कोटी रुपयांची वाढ होईल.  ज्येष्ठ नागरिकांच्या टीडीएसच्या मर्यादेत वाढ झाल्यानं त्यातून बँकांना 15 हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. जेष्ठ नागरिक नाहीत अशा व्यक्तींकडून 7 हजार कोटी रुपये बँकांमध्ये ठेवींच्या रुपात वाढणार आहेत, अस  एम. नागराजू म्हणाले. ज्येष्ठ  नागरिकांचे बँकांमध्ये 34 लाख कोटी रुपये आहेत,असंही नागराजू यांनी सांगितलं.

केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयामुळं 40 हजार कोटी ते 45 हजार कोटींच्या ठेवी वाढतील. याचा लाभ बँकांकडील गंगाजळी वाढण्यास होईल,त्यामुळं बँकांना इतरांकडू अतिरिक्त दरानं रक्कम घ्यावी लागणार नाही.  

एम. नागराजू यांनी यानंतर इतर गोष्टींसंदर्भात विचारणा करणयात आली. सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी एमटीएनएच्या कर्जाबाबत विचारलं असता त्यांनी कर्जदार देणारी बँक सध्याच्या नियमांच्या आधारावर कर्जपरतफेडीत सवलत देऊ शकतात. कर्ज देणारी एखादी संस्था किंवा बँक  कर्ज खातं सांमजस्यानं बंद करण्यासाठी एकूण कर्जाच्या काही रक्कम कमी करण्यास तयार होते.त्याला हेअर कट म्हटलं जातं.  

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स

0 ते 4 - Nil 
4 ते 8 - 5 टक्के
8 ते 12 लाख - 10 टक्के
12 ते 16 लाख - 15 टक्के
16  ते 20 लाख - 20 टक्के
20 ते 24 लाख - 25 टक्के
24 लाखापुढे - 30 टक्के

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना मध्यमवर्गाला दिलासा देणारी घोषणा केली होती. नव्या करचनेतील स्लॅब बदलण्यात आले. करमुक्त उत्पन्नाची रक्कम तीन लाखांवरुन 4 लाख रुपयांवर नेली आहे. तर, 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत देण्याचा निर्णय केंद्रानं घेतला. या निर्णयामुळं मध्यवर्गाला दिलासा मिळणार आहे. करसवलत दिल्यानं जी रक्कम मध्यवर्गाच्या हाती येईल ती त्यांनी खर्च करावी म्हणजेच पुन्हा अर्थव्यवस्थेत यावी, अशी अपेक्षा केंद्र सरकारला आहे. मध्यमवर्गाच्या हातातील रक्कम वाढल्यानं त्याची क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेला पुन्हा गती मिळेल, असा अंदाज केंद्राला आहे. 

इतर बातम्या :

Old Regime vs New Regime : नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाकाने कांदे सोलणारे, तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून संजय राऊतांचा प्रहार
नाकाने कांदे सोलणारे, तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून संजय राऊतांचा प्रहार
Indrayani Kundmala bridge collapse: प्रवाहात वाहवत गेलो, पोहता येत असल्यानं स्वात:ला वाचवू शकलो, पण..; इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्यांनी घटनाक्रम सांगितला 
प्रवाहात वाहवत गेलो, पोहता येत असल्यानं स्वात:ला वाचवू शकलो, पण..; इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला 
सिंधुदुर्गात पावसाचं थैमान, रात्रभर झालेल्या पावसानं होडवडे पूल पाण्याखाली, वेंगुर्ले बेळगाव हायवेवर वाहतूक ठप्प, नागरिकांना अलर्ट
सिंधुदुर्गात पावसाचं थैमान, रात्रभर झालेल्या पावसानं होडवडे पूल पाण्याखाली, वेंगुर्ले बेळगाव हायवेवर वाहतूक ठप्प, नागरिकांना अलर्ट
इंद्रायणी नदी पुलाला 8 कोटी मंजूर झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फक्त 80 हजारांचे पत्रच दाखवलं! म्हणाले, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जात आहे
इंद्रायणी नदी पुलाला 8 कोटी मंजूर झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फक्त 80 हजारांचे पत्रच दाखवलं! म्हणाले, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जात आहे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indrayani Bridge Collapse : कुंडमाळा पूल दुर्घटना, एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू,एकजण गंभीर जखमीMumbai BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात रस्ता खचला, बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात!Raj Thackeray on Indrayani Bridge : राज ठाकरे यांचं इंद्रायणी पूल दुर्घटनेवर ट्वीट, सरकारवर प्रश्नांचा भडिमारPune Demu Train Fire : दौंडहून पुण्याला येणाऱ्या ट्रेनच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाकाने कांदे सोलणारे, तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून संजय राऊतांचा प्रहार
नाकाने कांदे सोलणारे, तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय? कुंडमळा पूल दुर्घटनेवरून संजय राऊतांचा प्रहार
Indrayani Kundmala bridge collapse: प्रवाहात वाहवत गेलो, पोहता येत असल्यानं स्वात:ला वाचवू शकलो, पण..; इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्यांनी घटनाक्रम सांगितला 
प्रवाहात वाहवत गेलो, पोहता येत असल्यानं स्वात:ला वाचवू शकलो, पण..; इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला 
सिंधुदुर्गात पावसाचं थैमान, रात्रभर झालेल्या पावसानं होडवडे पूल पाण्याखाली, वेंगुर्ले बेळगाव हायवेवर वाहतूक ठप्प, नागरिकांना अलर्ट
सिंधुदुर्गात पावसाचं थैमान, रात्रभर झालेल्या पावसानं होडवडे पूल पाण्याखाली, वेंगुर्ले बेळगाव हायवेवर वाहतूक ठप्प, नागरिकांना अलर्ट
इंद्रायणी नदी पुलाला 8 कोटी मंजूर झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फक्त 80 हजारांचे पत्रच दाखवलं! म्हणाले, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जात आहे
इंद्रायणी नदी पुलाला 8 कोटी मंजूर झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फक्त 80 हजारांचे पत्रच दाखवलं! म्हणाले, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जात आहे
Indrayani Kundmala bridge collapse: आम्हाला तिकडे लावलेली पाटी दिसली असती तर.... कुंडमळा दुर्घटनेतील जखमींनी नेमकं काय सांगितलं?
आम्हाला तिकडे लावलेली पाटी दिसली असती तर.... कुंडमळा दुर्घटनेतील जखमींनी नेमकं काय सांगितलं?
Mumbai Best Bus Accident: गिरगावात अनर्थ टळला, मेट्रोच्या कामाजवळील रस्ता खचला अन् बस पाच फूट खड्ड्यात पडली
गिरगावात अनर्थ टळला, मेट्रोच्या कामाजवळील रस्ता खचला अन् बस पाच फूट खड्ड्यात पडली
Ratnagiri Rain updates: रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जगबुडीने इशारा पातळी ओलांडली; राजापूरच्या जवाहर चौकात पुराचं पाणी शिरलं
रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जगबुडीने इशारा पातळी ओलांडली; राजापूरच्या जवाहर चौकात पुराचं पाणी शिरलं
Sindhudurg News : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळचा खचलेला भाग बुजवला; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, कोकण प्रादेशिक विभागाचे अधिकारी पाहणी करणार
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळचा खचलेला भाग बुजवला; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, कोकण प्रादेशिक विभागाचे अधिकारी पाहणी करणार
Embed widget
OSZAR »