अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाची अवस्था वाईट! कमी दरात तिकीटे उपलब्ध, मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी किती तिकीट?
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाची मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सध्या ओअर इंडियाच्या विमानांचे तिकीटाचे दर देखील कमी करण्यात आले आहेत.

Air India : 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळून मोठ अपघात ( Ahmedabad plane crash) झाला होता. या अपघातात विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये 229 प्रवासी, 2 पायलट आणि 10 केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. याशिवाय, एअर इंडियाचे हे विमान ज्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये कोसळले त्या मेसमध्ये एका ज्युनियर डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबासह ३३ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर एअर इंडियाची मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सध्या ओअर इंडियाच्या विमानांचे तिकीटाचे दर देखील कमी करण्यात आले आहेत.
12 जूनला अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना ( Ahmedabad plane crash) झाली होती. यामध्ये 270 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एअर इंडियाची मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत एअर इंडिया स्वस्त तिकिटे देत असली तरी, हवाई प्रवासी त्यांच्या विमानांचे बुकिंग करण्यास प्राधान्य देत नाहीत. दिल्ली ते मुंबई जाण्यासाठी सर्वात स्वस्त तिकीट एअर इंडियाचे आहे. दिल्ली ते मुंबई तिकीट फक्त 5 हजार रुपये, म्हणजे तुम्ही फक्त 5000 रुपयामध्ये मुंबईहून दिल्लीला जाऊ शकता.
दिल्ली-मुंबई मार्गावरील विमानांचे दर
दिल्ली ते मुंबई जाण्यासाठी, आम्ही एअर इंडियासह 4 विमान कंपन्यांची तिकिटे तपासली, ज्यामध्ये सर्वात स्वस्त तिकीट एअर इंडियाचे होते. 21 जून रोजी म्हणजेच शनिवारी दिल्ली ते मुंबई एअर इंडियाचे तिकीट बुक केले तर या तिकिटाची किंमत फक्त 5716 रुपये असेल, तर 21 जून रोजी त्याच मार्गावरील स्पाइसजेटच्या विमानाची किंमत 7602 रुपये असेल. अशा परिस्थितीत, इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत एअर इंडियाच्या विमानांचे दर किती स्वस्त आहेत याचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता.
एअर इंडियाने भाडे का कमी केले?
12 जून रोजी ड्रीमलायनर 787-8 च्या अपघातानंतर, तांत्रिक समस्यांमुळे एअर इंडियाच्या अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ज्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे समाविष्ट आहेत. यासोबतच, एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, ज्यामुळे बहुतेक प्रवासी एअर इंडियाच्या विमानांमध्ये प्रवास करणे टाळत आहेत. यामुळे, एअर इंडिया कमी किमतीत हवाई तिकिटे देत आहे.
महत्वाच्या बातम्या: